Vitamin E
- divipawar94
- Jun 6, 2021
- 2 min read
Vitamin E हे मेदात विरघळणारे घटक आहे. इ जीवनसत्व ला टोकोफेरॉल ह्या नावाने देखील ओळखले जाते. हे आपल्या शरीरात एक अँटिऑक्सिडेन्ट म्हणून कार्य करते. आपल्या त्वचेसाठी व केसांसाठी खूप फायदेशीर आहे. सूर्यापासून निघणाऱ्या अतिनील किरणांपासून लढण्यास मदत करतो. स्त्रियांना मासिकपाळी दरम्यान खुप त्रास व वेदना सहन कराव्या लागतात. त्यावर Vitamin E हे फायदेशीर आहे.
शास्त्रीय नाव : टोकोफेरॉल Scientific Name : Tocopherol
Vitamin E फळे व भाज्या
गहू , रताळ, खजूर, ताजे दूध, जवस, सूर्यफुलाच्या बिया, किवी, टमाटर, अंडी, हिरव्या भाज्या, बदाम, अक्रोड, ब्रोकोली, एवोकोडा, मक्का, सोयाबीन, आंबा, पपई, पोपकोर्न, दुधी
शरीराला दररोज लागणारा डोस
जन्मापासून ६ महिन्यापर्यंतच्या बाळांना – ४ मिलिग्रॅम
७ ते १२ महिन्यापर्यंतच्या बाळांना – ५ मिलिग्रॅम
४ ते ८ वर्षांपर्यंतच्या मुलांना – ७ मिलिग्रॅम
९ ते १३ वर्षांपर्यंतच्या मुलांना – ११ मिलिग्रॅम
१४ वर्ष आणि त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्यांना – १५ मिलिग्रॅम
स्त्रियांना – १७ मिलिग्रॅम
Vitamin E फायदे
ई जीवनसत्व पूरक आहार फळे सेवन केल्याने आपले केस लवकर सफेद होत नाही. व केसांना फाटे देखील लवकर फुटत नाही. केसांची वाढ देखील चांगली होते. केस एकदम मुलायम व चमकदार होतात. त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे. Vitamin E मुळे आपली त्वचा तजेल दिसू लागते. त्वचा चमकदार राहते. चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. व आपली त्वचा रिपेअर करण्याचं काम देखील हे करत. या व्हिटॅमिन चे सेवन नियमित चांगल्या प्रकारे केल्यास आपल्या वाढत्या वयाचा प्रभाव चेहऱ्यावर कमी दिसू लागतो. आपल्याला अनेक प्रकार चे कर्करोग होण्यापासून देखील वाचवतो. एका अभ्यासात केलेल्या रिसर्च नुसार असं लक्षात आले कि कर्करोग अश्या लोकांना लवकर होतो ज्यांच्या शरीरात Vitamin E ची कमतरता असते. महिलांना मासिक पाळी दरम्यान खूप त्रास सहन करावा लागतो. जसे कि पाठ दुखणे, कंबर दुखणे, पाय दुखणे, पोटात दुखणे अश्या अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जाव लागत त्यामुळे Vitamin E युक्त फळे व पूरक आहाराचे चे सेवन चांगल्याप्रकारे केल्याने आपल्याला ह्या सर्व समस्यांवर आराम मिळतो.
Vitamin E अभावी होणारे रोग व समस्या
Vitamin E अभावी स्त्रियांना वांझपणा येऊ शकतो. जसे कि बाळाचा मृत्यू गर्भातच होणे. स्त्रियांच्या स्तनांचा आकार हळू हळू आकुंचन होऊ लागतो व छाती सपाट होते. कमतरतेमुळे मानसिक तणाव निर्माण होतो. व त्यामुळे केस गळणे व डोक्यावर टक्कल पडणे या सारख्या समस्या होऊ शकतात. पुरुषांमध्ये नपुंसकता सारखे दोष आढळून येतात. व तसेच वीर्य कमकुवत होण्यासारख्या समस्या देखील होऊ लागतात. ई जीवनसत्वाच्या अभावा मुळे हृदयरोग, मधुमेह, कावीळ, शरीरावर गाठ येणे यांसारखे आजार होऊ शकतात.
टीप - वरील कोणतेही उपचार आयुर्वेद तज्ञांच्या सल्ल्याने करावेत.
Dr. Divya Prakash Pawar
BAMS, MS (Gynaecology And Obstetrics)
DYT [Diploma In Yoga Teacher (योग शिक्षिका)]
PGDEMS (Post Graduate Diploma in Emergency Medical Services)
DDN (Diploma In Diet And Nutrition)
MDPK (Master Diploma In Panchakarma)




Comments